Thursday, December 10, 2009

एकेक मोती गळावया |


काल दिलीप चित्रे गेले , काही दिवसांपूर्वी सुनीताबाई गेल्या . अशीच एकेक सर्वाथानं उंच माणसं जायला लागली , तर इथं महाराष्ट्रात उरणार कोण ? - आपण आणि ठाकरे मंडळी !
हिंदी , मराठी ,इंग्रजी सर्व भाषात सहजतेनं वावरणारा हा माणूस ! खंडोबाच्या लोकगीतांच्या संग्रहापासून ,
'' बहुतेक पुढचं महाराष्ट्रगीत मी लिहीन ,
अटलांटिकच्या किनाऱ्यावर बसून , मुक्तलयीत ! "
काय शक्ती असते न एकेकाची - एका झटक्यात इतक ' ग्लोबल ' आणि इतक 'लोकल ' यांच्यात स्वीचओव्हर करणं काय सोपी गोष्ट आहे का ? तुकोबांना जागतिक पातळीवर नेले , ज्ञानदेवांच्या अनुभवामृताचा अनुवाद केला .काय आणि कसा घडला असेल हा माणूस ? दुसरा एक विचार मनात आला - काय देतो समाज या मनस्वी माणसांना ? त्यांचा मुलगा ' आशय ' भोपाळ वायूदुर्घटनेत जखमी झाला होता . श्रीराम लागूंचा मुलगाही रेल्वे मधून प्रवास करताना डोक्याला दगड लागून गेल्याचं मी ऐकलंय .
( वरच्या ओळी आणि बरीच माहिती ही - लोकसत्तेच्या सौजन्याने आहे. )

5 comments:

  1. अजून थोडं लिहिलं असतंस तर असं वाटलं.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अगं, त्यावेळी बातमी वाचून जेवढं सुचलं तेच लिहून काढलं .

    ReplyDelete